शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईतील कळंबोलीतून महिला पोलीस अधिकारीच दीड वर्षापासून बेपत्ता-घातपाताचा संशय, कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2017 22:50 IST

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकाºयाचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ

ठळक मुद्देकुटुंबीयांची तक्रार : : तपासाकडे दुर्लक्षकोल्हापूर जिल्'ातील आळते येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे

कोल्हापूर : गेल्या दीड वर्षापासून मुंबईतील कळंबोलीतून बेपत्ता झालेल्या महिला पोलीस अधिकाºयाचा उच्च न्यायालयाने आदेश देऊनही तपास करण्यात पोलीस टाळाटाळ करीत असल्याची तक्रार महिला पोलीस अधिकाºयाचे वडील जयकुमार बिद्रे, भाऊ आनंद बिद्रे व पती राजू गोरे यांनी केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक असलेल्या या महिलेचा तिचे वरिष्ठ पोलीस अधिकारी व सध्या ठाणे ग्रामीण पोलीस ठाण्याचे अधिकारी अभय श्यामसुंदर कुरुंदकर यांनी घातपात केला असावा, असा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे. ३१ जानेवारी २०१७ ला कळंबोली पोलिस ठाण्यात कुरुंदकर यांच्यावर याप्रकरणी अपहरणाचा (भादंवि कलम ३६४) गुन्हा (एफआयआर नंबर ००२९) दाखल झाला आहे.

अश्विनी राजू गोरे-बिद्रे या महिला पोलीस अधिकारी मुंबईतील कळंबोलीतून १५ एप्रिल २०१६ पासून बेपत्ता झाल्या आहेत. त्या बेपत्ता झाल्या नसून त्यांचे वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांनी त्यांना बेपत्ता केल्याचा आरोप करीत, त्यांच्यावर कळंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या तपासात पोलीसच त्यांना सहकार्य करीत नसल्याचा आरोप अश्विनी यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

कोल्हापूर जिल्'ातील आळते येथील अश्विनी जयकुमार बिंद्रे यांचा विवाह २००५ साली हातकणंगलेतील सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे यांच्याशी झाला. लग्न झाल्यानंतर एकाच वर्षात अश्विनी स्पर्धा परीक्षा पास झाल्या आणि त्यांना पोलीस उपनिरीक्षक पद मिळाले. त्यांना एक मुलगी असून, ती सध्या हातकणंगलेमध्येच तिसरीत शिकते. पोलीस दलात रुजू झाल्यानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे आणि त्यानंतर सांगली इथे झाली. त्यांची ओळख त्याच पोलीस ठाण्यात असणाºया वरिष्ठ पोलीस अधिकारी अभय कुरुंदकर यांच्यासोबत झाली. या दोघांमध्ये जवळीक वाढली होती. त्यानंतर २०१३ साली अश्विनी गोरे यांना प्रमोशन मिळाल्याने त्या रत्नागिरीला रुजू झाल्या. इथेही अभय कुरुंदकर हे अश्विनीला भेटण्यासाठी वांरवार येत होते. हे सर्व प्रकरण अश्विनी यांचे पती आणि वडिलांना समजले.

पुढच्या टप्प्यात कुरुंदकर आणि अश्विनीमध्ये सतत वाद होत होते. तेव्हा कुरुंदकरांनी अश्विनी यांच्या पतीला गायब करण्याच्या धमक्याही दिल्या होत्या. यामुळे अश्विनी यांचे कुटुंब व्यथित झाले होते. या काळातच २०१५ साली अश्विनी यांची बदली कळंबोली पोलीस ठाण्यात झाली. मात्र त्या हजर झाल्या नाहीत. त्या हजर का झाल्या नाहीत अशी विचारणा करणारे पत्र पोलीस खात्यानेही पाठविले. त्यावेळी अश्विनीच्या घरातील लोकांना त्या गायब झाल्याचे लक्षात आले. त्यांनी कळंबोली पोलिसांत याची तक्रार दाखल केली.

अश्विनी आणि अभय कुरुंदकर यांच्यातील वादाचे, प्रेमाचे सर्व संवाद अश्विनीने आपल्या संगणकात रेकॉर्ड करून ठेवले होते. अश्विनीच्या घरातील मंडळींनी जेव्हा संगणक पाहिला त्यावेळी या गोष्टी उघड झाल्या. अभय कुरुंदरकर यांनी भांडणादरम्यान वारंवार जिवे मारण्याच्या धमक्या दिल्याचे उघड झाले. हे सर्व पुरावे कळंबोली पोलिसांना देताच कुरुंदकर हे तत्काळ रजेवर गेले. गेल्या महिन्यात ते पुन्हा रुजू झाले. मात्र पोलिसांनी त्यांना चौकशीसाठी अद्यापही ताब्यात घेतलेले नाही.पोलिसांचे सहकार्य नाहीया प्रकरणी अश्विनीच्या कुटुंबीयांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांची भेट मागितली होती. मात्र त्यांना ती मिळाली नाही. उलट त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना भेटा, असा सल्ला दिला.चौकशीत हयगय म्हणून प्रसारमाध्यमांकडे धावअश्विनी गोरे बेपत्ता झाल्या असल्याची तक्रार त्यांचा भाऊ आनंद बिद्रे याने १४ जुलै २०१६ ला कळंबोली पोलिसांत दिली आहे. परंतू पोलीस त्याची दखल घ्यायला तयार नाहीत म्हणून बिद्रे व पती राजू गोरे यांनी आॅक्टोबर २०१६ ला उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. न्यायालयाने उपायुक्त दर्जाच्या अधिकाºयाने याचा तपास करावा असे आदेश दिले. त्यानुसार पोलिसांनी कुरुंदकर यांच्यावर फेब्रुवारी २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला व तशी माहिती न्यायालयातही दिली; परंतु तरीही त्यांना अटक करून प्रकरणाची चौकशी केली नाही म्हणून गुरुवारी यासंबंधीची माहिती त्यांनी प्रसारमाध्यमांना दिली. 

 

टॅग्स :PoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे